Image
पंचायत समिती उदगीर येथे राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा . उदगीर=पंचायत समिती उदगीर येथे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पशुधन अधिकारी श्री.भुपेंद्र बोधनकर,हे होते तर प्रमुख पाहूने म्हणून गटविकास अधिकारी श्री. प्रविण सुरडकर, कृषी अधिकारी श्री. बालाजी केदासे,तालूका पशुधन अधिकारी श्री. घोणषीकर हे होते. या प्रसंगी प्रशासनाकडून उल्लेखनीय कार्य केलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला ते ग्रामपंचायत बामणीस सन 2024/25 चा स्मार्ट ग्राम स्पर्धेत उदगीर तालुक्यात प्रथम क्रमांक व माझी वसुंधरा अभियानात विभागात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी संजय गुरमे , व स्मार्ट ग्राम स्पर्धा सन 2023- 24 नळगीर ग्रामपंचायत प्रथम क्रमांक व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विभागात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी बि . के कांबळे, तसेच सन 2022-23 चा स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत अधिकारी श्री. वैजनाथ मोरतळे तर , विशेष कर वसूलीत तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी श्री. शरद जाधव व राष्ट्रीय पशुधन गणना व बर्ड फ्लू च्या साथीचे नियोजन वेळेत केल्याने पशुधन अधिकारी श्री. घोणषीकर या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक विस्तार अधिकारी श्री. अंकुश बिरादार केले तर मार्गदर्शन गटविकास अधिकारी श्री . प्रविण सुरडकर , कृषी अधिकारी श्री बालाजी केदासे व शासनाच्या शंभर कलमी कार्यक्रमावर श्री. बोधनकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बि. के कांबळे यांनी केले तर आभार पंचायत विस्तार अधिकारी श्री. दंडे यानी मानले. यावेळी पंचायत समितीतीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
उदगीर मतदार संघात जलजीवन कामाचा बट्ट्याबोळ:- माजी आमदार सुधाकर भालेराव 👉 करोडो रुपये खर्च होऊन ही जनता एक एक थेंब पाण्यासाठी परेश्यान 👉 उदगीर मतदार संघात भ्रष्टाचाराने गाठला कळस :- सुधाकर भालेराव उदगीर :- उदगीर जळकोट तालुक्यात पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील योजना म्हणजे प्रत्येक घरी पाणी पूर्ण करण्यासाठी येथे जलजीवन योजना राबविली गेली पण गुत्तेदारानी ,अधिकाऱ्यांनी ही योजना जुन्या पाईप लाइन ला नवीन दाखवून तर कुठे निकृष्ट काम करून आपले घर भरून घेतले असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार तथा शरद पवार गटाचे नेते माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले उदगीर तालुक्यातील 108 गावात जलजीवन योजना मंजूर झाली त्या पैकी 66 गावात ही योजना पूर्ण झाली असून अनेक गावात या योजनेत भ्रष्टाचार झाला असून काही गावात तर जुनी पाईप लाइन नवीन दाखवून बिल उचलले असून ही योजना म्हणजे गुत्तेदार,अधिकारी यांचे घरभरन्यायासाठी राबवली का हा प्रश्न उपस्थित होत आहे कारण की या योजने वर करोडो रुपये खर्च होऊन ही जनतेला एक एक थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, उदगीर कराना दररोज शुद्ध पाणी मिळावे म्हणून मी माझ्या काळात करोडो रुपये खर्च करून लिंबोटी हून पाणी आणले पण नाकाम अधिकाऱ्यांमुळे आज उदगीरकराना 8,9 दिवसास पाणी मिळत आहे यांनी तिजोरी भरण्यासाठी 1500 रू ची पाणीपट्टी 3000 रु केली आता आम्ही हे सहन करणार नसून लवकरच आम्ही रस्त्यावर उतरून गुत्तेदाराचे ,अधिकाऱ्याचे पितळ उघडे पाडू असे ही ते म्हणाले,या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गट शहरअध्यक्ष अझीम दायमी सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
Image
पत्रकार भवन चे काम निकृष्ट करणारा गुत्तेदार बदलून त्यास काळ्या यादीत टाका= पत्रकार उदगीर= येथील पत्रकार भवनास 4 करोड चा निधी 6 हजार स्कायर फूट बांधकामास देऊन ही संबंधित ठेकेदार मुळातच निकृष्ट काम करत आहे,झालेल्या नाटिस पाण्याचा थेंब नाही ,असे हे करोडो रुपयाचे पत्रकार भवन बांधकाम गुत्तेदाराचे घर भरण्यासाठी असून सदर गुत्तेदार निकृष्ट काम करत असून याने जर पत्रकार भवन चे काम केले तर ते धोकादायक असल्याने त्वरित सबंधित गुत्तेदार बदलावे,त्यास निकृष्ट कामाबद्दल काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी येथील अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,नगरविकास मंत्री,विभागीय आयुक्त,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले असून त्वरित कार्यवाही न झाल्यास पत्रकार जे आंदोलन करतील त्यास प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन दिले असून आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय कार्यवाही करते हे पहावे लागेल
Image
उदगीरात भव्य मिरवणूकीने भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव संपन्न उदगीर : जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याण महोत्सव उदगीर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. जैन मंदिरापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त आज सकाळपासून भक्तांनी जैन मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. तदनंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला मंडळातर्फे विशेष लेझीम खेळाचे प्रदर्शन करण्यात आले. जैन मंदिरातून निघालेली शोभयात्रा चौबारा, कॉर्नर चौक, पत्तेवार चौक, मुक्कावार चौक, आर्यसमाज, सराफ लाईन मार्गे परत जैन मंदिरात हि शोभयात्रा स्थिरावली. शोभायात्रेच्या सांगता झाल्यानंतर मंदिरात भगवंतांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला व त्यानंतर सर्व उपस्थित समुदायासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत राजकुमार मानवतकर, हिरालाल जैन, पद्मकुमार जैन, कुलभूषण चौधरी, विशाल जैन, पारस जैन, सागर मानवतकर, विजय फुलाडे, सुनील जैन, राजू डोलचीपुरे, नितेश जैन, जवाहरलाल जैन, वर्धमान डोलचीपुरे, रमेश डांगूर अतिवीर डांगूर, कोमल जैन, दिपा मानवतकर, संध्या जैन, शीला जैन, प्रगती जैन, सोनाली जैन, अश्विनी जैन, पिंकी मानवतकर, स्नेहा मानवतकर, सेजल जैन, प्रीती कोंडेकर, श्रद्धा म्हेत्रे, विद्या जबडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
Image
श्री लक्ष्मीनारायण मंदिर कोपऱ्यातील चायनीज हॉटेल त्वरित हटवा,मंदिर प्रशासनासह,नागरिक, व्यापाऱ्याची निवेदन देऊन मागणी उदगीर:- येथील जागृती टाकीज ते लक्ष्मीनारायण मंदिर रस्त्याच्या कोपऱ्यावर काही दिवसापूर्वी चायनीज हॉटेल लावले असून येथून दररोज हजारो भक्त श्री लक्ष्मीनारायण मंदिरात येतात त्याच सोबत या हॉटेल मधे जे काही बनवले जाते त्याच्या वासाने तेथील व्यापारी फार परेशान आहेत येथील हॉटेल त्वरित येथून हटवावे अश्या आशयाचे निवेदन श्री लक्ष्मीनारायण मंदिर संस्थे चे पदाधिकारी व या भागातील व्यापारी व 55 नागरिकांच्या सह्याचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना देण्यात आले असून आता मुख्याधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पहावे लागेल
Image
बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेच्या अध्यक्षपदी दयानंद बिरादार तर सचिव पदी दत्तात्रय साबणे यांची निवड उदगीर:-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि.५) भालकी जि. बीदर येथे जनार्धन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पञकाराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परिषदेचे चिटणीस सचिन शिवशेट्टे यांनी बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेची कार्यकारणी जाहीर केली. यात अध्यक्षपदी दयानंद बिरादार, कार्याध्यक्ष तुकाराम मोरे, उपाध्यक्ष दत्तात्रय स्वामी, सचिव दत्ताञय साबने, सहसचिव प्रा. सौ. मिनाक्षीताई पाटील, कोषाध्यक्ष मन्मथ स्वामी कार्यकरिणी सदस्य म्हणून अंकुश वाडीकर, विद्यासागर पाटील, महेश हुलसूरकर, तुकाराम शेडोळे, विनायक शिंदे सल्लागार सदस्य म्हणून माधव पिचारे, पी.आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीची निवड झाल्याबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख सह उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.. येत्या कार्यकाळात जास्तीत जास्त पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली येतील आणि पत्रकारांचे प्रश्न आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा श्री.एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
Image
समाज को संपत्ति नहीं संतति सुदृढ़ करनी चाहिए :- संदीपजी काबरा(सभापति अखिल भारतीय माहेश्वरी महासभा) उदगीर = लातूर में अखिल भारतीय माहेश्वरी महासभा के सभापति संदीपजी काबरा ने समाज के साथ संवाद यात्रा में संबोधित करते हुए कहा कि,पद आएगा जाएगा हमको कार्यकर्ता के बीच रहना होगा 132 साल से महासभा चल रही है,वो कार्यकर्ता की वजह से समाज में संपत्ति बहुत है,समाज संपत्ति नहीं संतति सुदृढ़ करनी चाहिए,लड़का हो या लड़की उसके जन्म का उत्सव मनाए,समाज योजना बनाए नहीं किसी समाज प्रेमी के पैर खींचने की,समाज को अब चिंतन की आवश्यकता , युवाओंको अब अपने स्वास्थ की और ध्यान देना जरूरी,सबको अब एकजुट होकर काम करना होगा, अपना समाज दुबला नहीं समाज को अब आत्मनिर्भर होना जरूरी है ,बच्चों को मोबाइल से नहीं लोरी से सुलाए, मां अपने बच्चों पर संस्कार निर्माण करे,देश के लिए अच्छे व्यक्तित्व निर्माण करने का काम एक मां ही कर सकती है,सभा को अब समाज को ऊपर लाने के लिए काम करना होगा,बच्चों को प्रशासनिक सेवा में जाने हेतु प्रेरित करे,हनुमान बनने बहुत तैयार है लेकिन जांबुवंत बनने कोई तैयार नहीं है, समाज के लिए जांबुवंत बने,समाज को गरीब परिवार के लिए भामाशाह आगे आए,पदाधिकारी अहंकारी नहीं समाज के लिए मर मिटने वाला होना चाहिए, समाज का एक भी व्यक्ति वृद्धाश्रम में ना हो,आज समाज की लड़कियां अन्य समाज में क्यों ब्याह रही है उसपर चिंतन करे,कहना सरल है काम करना कठिन है,कहने वाले क्या कहेंगे छोड़ कर समाज को आगे लाने के लिए काम करे,संकल्प लो और सिद्धि करो,शादी में खर्चा करना बहुत सरल है लेकिन आप किसी परिवार को गोद लेकर उनके जीवन में आनंद भरे तो आप लाखों में एक होगे इस समय संदीपजी काबरा (सभापति अखिल भारतीय माहेश्वरी महासभा),अरुणकुमार भांगड़िया (उपसभापति महासभा), मधुसूदन गांधी(अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश), सत्यनारायण सारडा (मंत्री महाराष्ट्र प्रदेश),चिरंजीलाल दागड़िया (संघटन मंत्री महाराष्ट्र प्रदेश),राजकुमार पल्लोड (उपाध्यक्ष मराठवाड़ा, म. प्र.) के साथ अनेक मान्यवरो के साथ उदगीर तालुका माहेश्र्वरी सभा के पदाधिकारी और सदस्य बडी तादात मे उपस्थित थे
Image